Saturday, July 28, 2007

माझी अमेरिका वारी...दुस-यांदा!!!!

२७-जुलै-२००७
एकदा शब्दांशी खेळता येतं हे कळल्यापासून मला हा छंदच लागलाय, मनात येणारी प्रत्येक गोष्ट यमक जुळणार-या ओळीत पकडायचा प्रयत्न करायचा!!

कुठलातरी कवी चावला मला बहुतेक! :))))

ही गरम गरम.....ताजी ताजी कविता......माझे विचार....अमेरिकेबद्दलचे!!!!!



कोलंबसच्या या देशात
पोचलेय मी दुस-यांदा,
सगळ्यांनाच मोहवणा-या
अमेरिके मध्ये परत एकदा....

काय हवंय मला नक्की
मलाच कधी कधी कळत नाही,
माझ्या माणसांजवळ राहाणं कायम छान
कि हवं आहे पूर्ण स्वातंत्र्य अन् सुखसोयी....

प्रश्न पडतो मला हा नेहमी
आवडेल का मला इथेच थांबायला,
आयुष्य कसं छान चालेल
नसेल जागा कदाचित नाव ठेवायला....

जरी आवडला मला खूप
इथे मिळणारा स्वतंत्रपणा,
तरी माझ्या माणसांपासून दूर
मध्येच एकटेपणा लागतो बोचायला....

इथे फ़क्त प्रत्येकाला सवय
स्वत:पुरते पाहण्याची,
एकमेकांच्या खाजगी आयुष्यात
चुकून ही न डोकावण्याची....

मग मला आठवते
मागे राहिलेले माझे घर,
नसेल इथल्यासारखा रेखीव
पण ओळखीचा परिसर....

पाहते जेव्हा इथे कायम राहणारे
लोक माझ्या देशातले,
ना धड इथे पूर्ण रुजलेले
ना तिकडचे पण राहिलेले...

एकदा इथली सवय झाल्यानंतर
मग तिकडचं काहीच नाही आवडत,
हव्या असतात फ़क्त इथल्या चांगल्या गोष्टी
बाकी सगळं मात्र मन नाही स्वीकारत....

नाही पाहायची मला मुळीच
माझी अशी स्थिती झालेली,
स्वत: मनाने भारतीय राहिले तरी
पुढची पिढी अमेरिकन झालेली....

मग हरघडी त्याना पाहून
मनात आपल्या शंका येत राहणार,
बरोबर होता का इथं राहाण्याचा निर्णय
हि गोष्ट कायम खात राहणार....

एकदा या मोहात पडले तर
माहीत आहे पडेल नंतर संभ्रम,
अजून काही वर्षे राहावे की परतावे
हा तिढा सुटणार नाही कायम....

असू दे गर्दी, खड्डे अन् प्रदूषण
माझं पुणंच शेवटी खरं,
असू देत चार सुखसोयी कमी
पण माझ्या पुण्यात राहावं हेच बरं!!!!!!!!

9 comments:

Vaidehi Bhave said...

Hi Neesha.
kavita khup chan ahe...barichshi mazyashi relate karnari vatli mhanun manala jast bhavli....keep it up...

Nikhil said...

Hi Nish ...

Sundar Kavita Lihili aahes ... Kavita vaachtana pratyek kshani ase vatat rahate ... ki kharech kiti ekti padli aahes tu ...

Pan manacha ha ekte pana kavitetun maandanyache surekh kaam tu kele aahes. Majhya shubeccha satat tujhya barobar aahet.

निशा............ said...
This comment has been removed by the author.
निशा............ said...

@Nikhil

he he........

ekti vagaire nahi padaley.........na homesick zaley....

kavita ka bhoot sawaar hai.....ase fartar mhanata yeil..........

shrikrishna said...

निशाताई,
स्वतःच्या मनात आलेले विचार प्रदर्शीत करायला कविते सारखं उत्तम माध्यम नाही.तू काही म्हणालीस तरी तुझ्या मनातले दोलायमान तुझी कविताच सांगते
एकटेपणा म्हण,किंवा आणखी काही तरी म्हण,तुझ्या मनातला संभ्रम उघड आहे.जे चांगलं आहे ते चांगलंच असणार मग ते ईकडे असो वा तिकडे असो,अशावेळी माणूस आपलं मत आपणच ठरवतो.आणि त्याचं justification करतो.असंच काहीसं तुझी कविता सांगते,असं मला वाटतं.असो.
तुझ्या कवितेतली सर्व कडवी मी माझ्या मनाने अगदी
विरोधाभास होईल अशी लिहीली माझ्या कवितेत.जणूं अमेरिकेत रहाणं मला किती पसंत आहे हे कारणं देऊन माझी कविता सांगते.
पण जाऊदे तुला वाईट वाटेल म्हणून मी ईकडे माझी कविता देत नाही.फक्त शेवटचं कडवं मी खाली देत आहे

अमेरिका कायम सोडून आल्यावर एक दिवस माझ्या मनात आलं

"पाहून गर्दी, खड्डे आणि प्रदुष्ण

मच्छ्रर,माशा आणि थुंकणंपण

असो ती मुंबई अथवा पुणं

मज वाटे

पत्करलं ते अमेरिकेतलं रहाणं"

निशा............ said...

@Shrikrishna

पहिली गोष्ट....मला ताई म्हणू नकोस रे!!! जरी मी तुझ्यापेक्षा कदाचित मोठी असले तरी..मला म्हातारं झाल्यासारखं वाटतं :)))))

हो....संभ्रम तर आहेच....प्रत्येक बाजूला काही चांगल्या आणि आकर्षित करणा-या गोष्टी आहेत...

चांगल्या ठीक आहेत...पण कुठल्या बाजूच्या वाईट गोष्टी मला long term मध्ये adjust करता येतील हे मला शेवटी ठरवायचं होतं...

प्रत्येकासाठी हे उत्तर वेगळे असते....

माझ्यासाठी "better back on home ground" हे उत्तर मी काढलं!!!

-निशा.

shrikrishna said...

निशा,
नांव, तूझं असल्याने ते कसं संभोधावं हा तुझा अधिकार मी मान्य करतो.तुझ्या

फोटोवरून तू म्हातारी नक्कीच नाहीस हे मी केव्हांच समजलो होतो.निदान माझ्या

एव्हडी तरी नक्कीच नाहीस.पण अपरिचीत व्यक्तीला आदराने संभोधावं हे आपल्या

मराठ्मोळ्या वळणाला धरून तसं मी तुला "ताई" असं म्हट्लं एव्हडंच.
ह्या १४ ऑगस्ट्ला मला ७४ संपून ७५ लागणार.
तुझी कविता मला आवडली आणि interest घेऊन वाचली आणि तू म्हणतेस तसंच

माझ्या "कंबक्त" डोक्यात तुझ्याच विषयावर पण विरोधाभासांत एखादी कविता सुचू

लागली.निर्मीती ही एक निसर्गाची "चाल " आहे असे मी मानतो.तुला वेळ

असल्यास,कुतुहल असल्यास, आणि जरूरी वाटल्यास marathiblogs.net वर

जाऊन माझ्या "कृष्ण ऊवाच" ह्या blogवर "टिचकी" मार वाटलं तर."पसंत अपनी

अपनी,ख्याल अपना अपना" ह्या शिर्षकाखाली ह्याच विषयावरची माझी कविता वाचावीस

ही विनंती.त्या blog वर आणखी काही काही मी बरंच लिहीलं आहे.मला पण तुझ्या

सारखा कविता लिहीण्याचा छंद आहे.राहीलेल्या आयुष्याचा pass time आणखी

काय करणार? वाचून comments केल्यास मला आवडेल.माझं वंय तुझ्या आजोबा

सारखं नसेल कदाचित पण तुझ्या वडीलांसारखं नक्कीच आहे.
"shrikrishnasamant.wordpress.com" हा माझा url आहे.अन

"google" वर "shrikrishnasamant" असा one word दिल्यासपण माझा

"कृष्ण ऊवाच" हा blog दिसेल.
तूं अशाच सुंदर सुंदर कविता लिहीत रहावेस ही ईच्छा.
"Better back at home ground" असं तुला वाटणं तुझ्या द्रुष्टीने योग्य आहे
निशा, एक मात्र निश्चीत "मी तरी तुला कधी चावलो नाही"

श्रीकृष्ण सामंत
स्यान होझे ca.

phondekar.kalpesh said...

खुप सुंदर लिहीली आहे कविता.

anirudha said...

kay he... kiti lihoon thevlas