पुस्तक परीक्षणांशिवाय.......मी माझ्या दैनंदिनीत अजून खंडीभर गोष्टी लिहील्या आहेत...लिहिते.....दैनंदिनी म्हणजे रोज काही लिहीतेच असं नाही.....लिहीण्यासारखं घडलं...वेळ असला........आणि मुख्यत: मधूनच कधीतरी "हळ्वी आणि जास्त विचार करणारी मी" जागी होते.....तेव्हा डायरीची पाने हमखास पांढ-याची काळी होतात. एरवी महिना महिना मी ती उघडत नाही....
असेच काही विचार.....खास कुठल्या घटनेवर मी केलेला काथ्याकूट...."आपण कसे आहोत" याबद्दल मी खरडलेले काही परिच्छेद इथे देते आहे. काही ठिकाणी कदाचित xxxxxxx दिसतील....ते माझे खाजगी (मला प्रकाशित करण्याची इच्छा नाही...असे काही) असलेल्या वाक्यांच्या जागी टाकलेत.....
जे शब्द मी डायरीत इंग्लिशमध्ये लिहिलेत...ते मराठीत भाषांतर करण्याच्या भानगडीत न पडता...तसेच इंग्लिश मध्येच लिहीलेत.....
९ -Dec-१९९९
परवा C च्या क्लासहून परत येताना माझ्यासमोर एक accident झाला. एका स्कूटरने रस्ता ओलांडणा-या एका म्हाता-या बाईला उडवले. चालवणार-याला बरंच लागलं, ती बाई तर उडून रस्त्यावर पडली आणि बेशुद्धच झाली. तिलाही बरंच लागलं होतं. तसंच नुसतं बघून पुढे जाणं मला बरं वाटलं नाही म्हणून मी गाडी थांबवली व तिथे गेले. तोपर्यंत लोकांनी तिला रस्त्याच्या कडेला आणलं होतं. पाणी पाजूनही ती शुद्धीवर येत नाही म्हटल्यावर लोकांनी एक रिक्षा थांबवली आणि तिला रिक्षात घातले. त्या वेळी त्या बाईची पिशवी माझ्या हातात होती मग "तुम्ही जरा जाता का?" वगैरे लोकांनी म्हटल्यावर मीही रिक्षात बसले. धनश्रीही बरोबर होती. आम्ही जवळच्याच दवाखान्यात गेलो तर डॉक्टर म्हटले..मेंदूला धक्का बसला आहे...यांना संजीवन मध्ये न्यावं लागेल. तोवर गर्दी पांगली होती आणि डॉक्टरांच ऎकून नंतर रिक्षावालाही म्हणायला लागला की मला दुसरीकडे जायचे आहे, दुसरी कुठलीतरी रिक्षा घ्या. म्हणजे तो ही हात झटकून मोकळा झाला.
इथं मी..नाव..गाव माहित नसलेल्या आणि बेशुद्ध बाई बरोबर!!! आता पूर्ण जबाबदारी माझ्यावर म्हटल्यावर मला खूप टेन्शन आले. क्षणभर तर तिथून पळून जावं का...असा विचार आला..जर तिला काही झालं असतं तर??? पण माझा देव मला अशा परिस्थितीत टाकायला तयार नव्हता. ज्या स्कूटरने धडक दिली त्याच्या मागच्या माणूस तिथं आला आणि आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत..असे म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. मग जरा माझं टेन्शन जरा कमी झालं. पण जर तो आला नसता तर मी काय केलं असतं? मी आत्ता सांगू शकत नाही.
"रस्त्यावर अपघात झाल्यावर आजूबाजूच्या लोकांनी मदत केली नाही" अशी बातमी वाचल्यावर त्या तथाकथित आजूबाजूच्या लोकांना नावं ठेवणं सोप्पं असतं पण जर अशी मदत करायचा प्रयत्न केला तर काय मनस्थिती होऊ शकते याचा अनुभव मला आल्यावर मी जरा नावं ठेवताना जरा विचार करेन. पुन्हा असं कधी माझ्या समोर झालं तर मी मदत करेनच पण आधी अशी कोणाची जबाबदारी घेण्यासाठी जी मानसिक आणि क्वचित लागणारी आर्थिक कुवत आल्याशिवाय अशा गोष्टीत पडणे म्हणजे एखाद्याच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. त्यामुळे नंतर "पळून जावं का?" असे विचार यायच्या ऎवजी सुरवातीलाच मी योग्य निर्णय घेईन.
Saturday, May 12, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Farach Sunder blog ahe.
Post a Comment